मोगल इतिहासकारांच्या पक्षपाती आणि विषारी लिखाणानं ज्याची उज्वल कीर्ती कलंकित झाली तो अखेरचा हिंदू सम्राट हेमू उर्फ हेमचंद विक्रमादित्य याच्या वास्तव जीवनाचा वेध घेणारी ऎतिहासिक कादंबरी.
औरंगजेबा ऐवजी दाराशुको बादशहा झाला असता तर ? कुणी सांगाव? हिंदूस्तानचा इतिहास कदाचित बदलला असता. आयुष्यभर हा सहिष्णू शहाजादा धर्मवेडयांशी झुंझला, या लढयात आपले पंचप्राण उधळून गेला.
दारा शिकोह! एक सहिष्णू, विद्वान, ज्ञानोपासक विचारवंत आणि या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचा खरा पाईक!
देवयोद्धा - (तीन खंड आणि एक पुस्तिका) थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदीप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक कादंबरी
अर्ध राज्यचं काय ,सुईच्या अग्रावर मावेल इतका या भूमीचा धूलीकणही मी जिवंत असेपर्यंत त्यांना मिळणार नाही.