म. सु. पाटील यांनी प्रस्तुत पुस्तकात नवी-जुनी कविता व त्या कवींचे कवित्वशोध यांची माहिती दिली आहे. या लेखांतून त्यांनी कवींचे काव्यसंवेदन कसे बदलत चालले होते याचे वर्णन केले आहे.
ही समीक्षा अर्थनिर्णयन करताना साहित्यकृतीच्या मागणीप्रमाणे मानसशास्त्रीय, आदिबंधात्मक, रुपनिष्ठ इत्यादी समीक्षादृष्टींचा जसा अवलंब करते, तसाच जगणे आणि भाषेतील जगणे यांचाही विचार करते.
भारतीय साहित्यसमीक्षेची परंपरा आणि तिच्यातील परिवर्तन