कॅ.बेलवलकर लिखित पेशवाईच्या काळावरील ४ कादंबऱ्यांचा संच.
महाराज तक्तारवार विराजमान होताच बाजीराव एक पाऊल मागे सरले, त्यांनी परत आदब ठेवून महाराजांना त्रिवार मुजरा केला. ते मातोश्रींच्या बैठकीजवळ गेले अन त्यांना मुजरा करुन ते महाराजांच्या उजव्या हाताअला असलेल्या पेशवाईच्या बैठकीवर विराजमान झाले.
पेशवाईचा माध्यान्हकाळ म्हणजे नानासाहेबांची कारकीर्द ! तिचा यशस्वी पूर्वार्ध कॅ. बेलवलकरांची ही कादंबरी प्रस्फूर्त होण्यास कारणीभूत झाला !
श्रीमंत रघुनाथरावांची तेग, त्यांना घेरणार्या गनिमावर विजेसारखी कोसळत होती. अटकेच्या किल्याचा परिसर तोफांमधून उडलेल्या दारुगोळ्यांच्या वर्षावाने काळवंडून गेला होता आणि त्यातच पांढर्याशुभ्र घोड्यावरील मार्तंड केशरी पेहराव ल्यालेली आणि हाणा... मारा... अशा आरोळ्या देत गनिमावर तुटून पडणारी दादासाहेबांची विकराल पराक्रमी मूर्ती पाहुन अर्धमेला झालेला मराठी...
25/30 वर्षातल्या घटनासंबंधाने मराठी, इंग्रजी, फ्रेंच, हिंदुस्थानी वगैरे भाषांत इतके विपुल साहित्य, म्हणजे जुने ऎतिहासिक साहित्य उपलब्ध झाले आहे की, अभ्यास करणारा गोंधळून जातो. तेव्हा सामान्य वाचकाला रमवावे आणि कादंबरीच्या वाटेने त्याला सुखवीत न्यावे अशी कल्पना कोणा रसिकाच्या मनात उद्भवली असेल तर ते उचितच म्हणावे लागेल.