भूमिहीन रसिया आवो ना : गोमंतकातील माणसे आणि निसर्ग यांचे नाजूक पदर उलगडून दाखवणार्य, गोमंतकीय लेखिका माधवी देसाई यांनी लिहिलेल्या दोन भावपूर्ण कादंबर्या.
माधवी देसाईंचे कादंबरीलेखन
पंधरा वर्षांच्या पुरंधीपासून ते साठी पार केलेल्या प्रौढ वयापर्यंतच्या स् त्री मनाची वेगवेगळी स्पंदने टिपणार्या, अवलोकनातून रेखाटलेल्या आणि माधवी देसाई यांच्या खास लेखनशैलीतून मांडलेल्या नव्या पंधरा कथांचा संग्रह.
माधवी देसाईंचे कादंबरीलेखन
आता गळ्यात सौभाग्य अलंकार नसतो, पण कपाळावर लालभडक कुंकू असतं... ती निशाणी असते माझ्या प्रिय हिंदू धर्मांची ! अनेक रुपांत बदलत गेलेल्या भारतीय स्त्री जीवनाची ! ती कपाळावरची रक्तरंजित खूण असते ! मी भोगलेल्या वेदनेची, शोकाची, सुखाची अन मोहाचीही ! मोहाच्या फुलांचा रंग लालच असावा बहुधा !
परिवर्तन : ही माधवी देसाई यांची कादंबरी गोव्याच्या शेतांत-कुळागारामधल्या झालेल्या अनेक परिवर्तनाचे चित्रण आहे. ही कादंबरी किंवा साहित्य कलाकृती नसून पुरोगामी दिशा दाखविणारी मशाल आहे.
निसर्गरम्य गोव्याच्या पार्श्वभूमीवर आजवर अनेकानेक कादंबर्या प्रसिद्ध झाल्या आहेत ;परंतु गोव्यातील समकालीन समूह-जीवनाचं यथायोग्य चित्रण करणारी ही पहीच कादंबरी...
या जीवनात काहीच अर्थ नसता, तर माणूस असा जीवनाच्या पाठीमागे धावला नसता. माणसाचं जीवन म्हणजे एक झोकाच!