हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षाचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आहे. प्रा. डॉ. अरुण शिंदे यांनी या नियतकालिकांचे केवळ सामाजिक स्वरूप व योगदान यांचीच दखल घेतलेली नसून, त्यांचे वाङ्मयीन मूल्यही सांगितले आहे. या काळात एक पर्यायी निकोप संस्कृती कशी आकार घेत होती, त्याचे चित्रण त्यांनी आपल्या या ग्रंथातून...