महाराष्ट्र् टाइम्स मध्ये निरनिराळया प्रसंगाने लिहिलेले काही लेख येथे संग्रहित केले आहेत. ते राजकारणबाहय अशा विषयांवर आलेत.
ब्रिटनमधील सरोवराच्या प्रदेशातून केलेली ही संवेदनशील मनाची प्रसन्न सफर आहे. छोटया छोटया निरिक्षणातून गवसलेले भव्य अर्थ आहेत
इंग्लंडच्या वाड्.मयाचे कालखंड देशाच्या राजाच्या वा राणीच्या नावाने ओळखले गेले आहेत.
या पुस्तकात गोविंद तळवलकरांच्या व्यक्तिमत्वातील अनेकविध पैलूंचा परिचय करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या मुलींनी केला आहे.
अनुक्रम - महात्मा गांधींचा उदय, प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा, मंत्रिमंडळाची वाटचाल, मुस्लिम राजकारण, वादंग, संघराज्य आणि संस्थाने, सुभाषबाबूंचे बंड, दुसरे महायुद्ध आणि बर्याच गोष्टींचा समावेश या पुस्तकात आहे
आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासावरील ग्रंथांमध्ये त्रिखंडात्मक सत्तांतर: १९४७ तसेच नवरोजी ते नेहरु, नियतीशी करार, भारत आणि जग आणि द्विखंडात्मक गांधीपर्व या त्यांच्या ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अभिजात ललित आणि वैचारिक साहित्य, शास्त्र तथा कलाकृतींना देशकालाचे बंधन नसते.
भारत स्वतंत्र झाला, येथे एकछत्री शासन निर्माण झाले, तरी येथे अपेक्षित समाज परिवर्तन झालेले नाही, आधुनिक समाज निर्माण होऊ शकलेला नाही. याची कारणे कोणती, नि याचे उत्तरदायित्व कोणाकोणावर पडते, या प्रश्नांची अभ्यासपूर्वक उत्तरेही श्री. तळवलकरांनी या ग्रंथात दिली आहेत.
गोविंदराव तळवलकर हे द्रष्टा इतिहासकार, विचारवंत, समाजसुधारक व उदारमतवादी पत्रकारितेचा मानदंड म्हणून सुविख्यात आहेत.
आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासावरील मराठी ग्रंथात ‘सत्तांतर : १९४७’ या ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण आहे.
भारतात घडलेल्या या ऐतिहासिक संत्तांतराला नव्वद वर्षे लागली. या दीर्घ काळाचा साक्षेपी इतिहास ह्या त्रिखंडात्मक ग्रंथात आहे.
भारतात घडलेल्या या ऎतिहासिक सत्तांतराला नव्वद वर्षे लागली. या दीर्घ काळाचा साक्षेपी इतिहास ‘सत्तांतर:१९४७’ या त्रिखंडात्मक ग्रंथात आहे. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सुचवलेल्या घटनाविषयक सुधारणांचा, त्यांच्या प्रेरणांचा व यशापयशाचा आढावा त्यात आहे.
श्री. गोविंद तळवलकर यांच्या चतुरस्त्र व्यासंगाचा आणि चिकित्सक लेखनाचापरिचय आपल्याला असतो. देश - विदेशातले असंख्य लेखक, कलावंत, राजकारणी यांच्या इतकीच भिन्न भिन्न साहित्यकृती नाटके आणि चित्रपट यांची ओढ त्यांच्या मनाला असते.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये काही वर्षे ‘वाचता वाचता’ हे सदर ‘वाचस्पती’ या टोपण नावाने गोविंद तळवलकर यांनी लिहिले होते .त्या लेखांचे हे पुस्तक.दुसरी आवृत्ती.
आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्टे ठेवले आहे.